
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
भंडारा/ राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, युवा ,बेरोजगार, विद्यार्थी ,महिला, गोरगरीब सामान्य कष्टकरी यांच्या मूलभूत गरजा कडे शासनाचे झालेले दुर्लक्ष यामुळे जनतेची होणारी आर्थिक, सामाजिक कोंडी फोडण्यासाठी शासनाचे जनतेच्या न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 16 ऑक्टोंबर 2023 रोज सोमवारला उपविभागीय कार्यालय तुमसर वर काढण्यात आलेल्या धडक मोर्चा चे आवाहन चरण वाघमारे यांनी केल्यावर त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, विद्यार्थी, युवा-युवती सामील झाल्या होत्या. या मोर्चासाठी भारत राष्ट्र समिती आणि विकास फाउंडेशन या सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या संघटनाने पुढाकार घेतला होता. तुमसर आणि मोहाडी विधानसभा क्षेत्रातील एकूण 17 ही जिल्हा परिषद क्षेत्रातील जनतेसह ,तुमसर शहरातील लोकं सुध्दा उपस्थित होते. या धडक मोर्चातील मागण्या आणि त्यांची आजची गरज याची तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील गावागावात चर्चा होतानी दिसत होता. मागण्या संबंधातील लोकांचा आक्रोश सरकार वर असल्याने धडक मोर्चा मध्ये शेतकरी,शेतमजूर, कामगार, युवक ,बेरोजगार ,असे विविध क्षेत्रातील समस्याग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या या मागण्याकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा त्याला पुढच्या निवडणुकीत याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे वातावरण निर्माण झाल्याचे दिसले. या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना तेलंगणा राज्याप्रमाणे प्रति एकर दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांना बाराही महिने 24 तास उच्च दर्जाची वीज मोफत देण्यात यावी. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या पाच लक्ष रुपयांचा विमा काढण्यात यावा. तेलंगणा राज्याप्रमाणे दलित बंधू योजना सुरू करून रोजगारांसाठी दहा लक्ष रुपये बिना परतावा देण्यात यावे. आदिवासी लोकांना रोजगारासाठी दहा लाख रुपये विनापरतावा देण्यात यावे. शेतकऱ्यांचा कर्जमाफ करण्यात यावा .शेतमालाची हमीभावाने तात्काळ खरेदी केल्यावर सात दिवसाच्या आत पेमेंट देण्यात यावे. तेलंगणा राज्य प्रमाणे सर्व जाती-धर्माच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्काची फी प्रतिपूर्ती करून त्यांना वस्तीगृहाची सोय करावी. धान पिकावर मावा, तुडतुडा रोग आल्याने झालेले मोठ्या प्रमाणातील नुकसानाची भरपाई देण्यात यावी.पिक विमा लागू करण्यात यावा . पूर पिडिताना आर्थिक मदत देण्यात यावी. पुरामुळे धान व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या जाहीर केलेल्या प्रोत्साहन अनुदान देण्यात यावा. २०१५ च्या कर्जमाफी योजनेतील वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. घरकुलासाठी विनामूल्य रेती उपलब्ध करून देण्यात यावी. शासकीय, निमशासकीय, खाजगी कामाकरिता रेतीचे डेपो सुरू करावे.घरगुती वापराच्या विजेदर कमी करावे .स्मार्ट मीटरच्या वापर करणे बंद करावे. शासनाने घरकूल योजनेचा कोटा वाढवून देण्याची घोषणा केली ती पूर्ण करून वंचित पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ देण्यात यावे. घरकुलासाठी मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानात वाढ करावी. घरकुल पात्रतेची जाचक अट शिथिल करण्यात यावी. सोंड्या लिफ्ट योजना वैनगंगा नदीवर सुरू करण्यात यावी. धानाला प्रतिक्विंटल पंधराशे रुपये बोनस देण्यात यावा.कंत्राटी नोकर भरती बंद करावी. अटल बांधकाम कामगार घरकुल योजनेच्या प्रलंबित प्रस्तावाला तात्काळ मान्यता देण्यात यावी. संजय गांधी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ व इतर योजनेचे अनुदान प्रत्येक महिन्याच्या तीन तारखेपर्यंत लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे. सोरणा तलावात बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याचे थांबलेले काम पूर्ण करावे. भंडारा ते बालाघाट स्त्यासह इतर रस्त्यांचे तात्काळ दुरुस्ती व मजबुतीकरण करून रस्ते अपघात थांबवावे . एसटी कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत समावेश करण्यात यावे. परवानाधारक ऑटो रिक्षा चालकांचा मंडळ स्थापन करण्यात यावा. बिडी कामगारांची सातशे रुपये वरून दोन हजार रुपये पेन्शन सुरू करण्यात यावी. विणकर कारागिरांना प्रोत्साहन भत्ता म्हणून दोन हजार रुपये प्रति महिना देण्यात यावा. यांसारख्या जनसामान्यांच्या समस्या तात्काळ सोडण्यात यावे. अन्यथा सम्पूर्ण जिल्हाभर आंदोलन, मोर्चे काढू असा इशाराच धडक मोर्च्यांच्या माध्यमातून देण्यात आला, भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भातील नेते तुमसर चे माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वा खाली , पूर्व विदर्भ सह समन्वयक माजी आमदार बाळासाहेब साळुंखे गुरुजी,BRS जिल्हा समन्वयक श्री.धनंजयजी मोहोकर, जिल्हा सह समन्वयक डॉ.युवराजजी जमाईवार,जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेश सेलोकर, पंस तुमसर सभापती नंदू रहांगडाले,जिल्ह्याचे शेतकरी आघाडीचे प्रमुख श्री. राजेशजी पटले,पंस मोहाडी चे उपसभापती विठ्ठल (बबलू)मलेवार ,जिल्ह्याचे महिला आघाडी प्रमुख श्रीमती, उर्मिलाताई आगाशे,जिल्ह्याचे युवा आघाडी प्रमुख श्री.गौरव नवरखेले ललीतकुमार शुक्ला, विधानसभा समन्वयक,BRS.

हंसराज आगाशे, तालुका समन्वयक, मोहाडी,BRS राजेंद्र (छोटू)तुरकर, तालुका समन्वयक, तुमसर.BRS.हरिश्चंद्र बंधाटे, परमानंद कटरे,महेताबसिंग ठाकूर, राजू गायधने, यादवराव कुंभारे, अनिल न्यायखोर,पल्लवीताई कटरे,सीमा ताई गौपाले, सुरेखाताई खराबे,निशा ताई पशीने, सुलभाताई हटवार आणि विकास फाउंडेशन व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, युवा, बेरोजगार, युवती, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Total Users : 883068
Total views : 6488500
