
मुनीश्वर मलेवार प्रतिनिधी/ तालुक्यातील ग्रामीण भागात बहुतांश शेतकरी वर्ग पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेतीची लागवड करीत असतो पावसाळ्यातील पाण्याचा आधारावरच बहुतांश शेतकरी धान पीक घेतली जातात धनाच्या एकाच पिकावर शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह चालत असून निसर्गावर अवलंबून राहून अनेक शेतकऱ्यांना शेती करावी लागते परंतू नहर बंधारे आधारे येणाऱ्या पाण्याअभावी शेतकरयांना शेती पीक लागवडी करता येत नाही ही समस्या अजूनही कायम आहे शेती पिकांची लगवढ करण्यासाठी पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी वाहत्या पाण्याअभावी शेतकऱ्यांना अडचणी होत असतात तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेत जमिनी असून पाण्याअभावी कोरड्या पडलेली आहेत शेतावर पाणी पोहचवण्यासाठी मोठ्या प्रमाणत बंधारे नहर बांधले असून देखील शेतावर वेळीच नहार वाटेने पाणी पोहचत नाही तर काही शेतशिवरात बंधरे व नहर बनलेच नाही त्यामुळे शेत शिवार कोरडेच पडलेले असतात त्यामुळे बहुतांश शेतकरी वर्गाचे पिके पाण्याअभावी रखडले जाते शासनाने विविध योजना राबवून शेत तिथे पाणी उपक्रम राबविले आहे परंतु बांधलेलं मोठ मोठे बंधारे आणि नहरांची अवस्था दिसेंदिवस निरुपयोगी होत आहे बंधारे नहर बांधलेलं असून सुध्धा आजही त्यातून शेत शिवारात पाणी वेळीच पोहचत नाही त्यामुळे बहुतांश शेत जमिनी कोरड्या पडलेल्या आहेत पण्या अभावी शेतकरी शेतावर पीक घेण्यास दुर्लक्ष करत असतात ग्रामीण भागात बंधारा आणि नहराच्या सहायाने जर प्रत्येक शेतावर पाणी पोहचले तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अडचणी दूर होऊ शकतील आणि शेती पिकांची वाढ होऊ शकेल





Total Users : 883251
Total views : 6488727
