
तिरोडा:- तिरोडा तालुक्यात आमदार विजय रहांगडाले यांच्या कारकिर्दीत धापेवाडा उपसा सिंचन योजना कार्यन्वित असून या योजनेचा लाभ क्षेत्रातील शेतक-यांना योग्य पाणी मिळावा याकरिता आमदार महोदय नेहमी आढावा घेत असून नागपूर येथे सिंचन भवनात आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यामध्ये प्रामुख्याने धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-१ अंतर्गत सिंचन सुरु असुन तेथील पुच्छ भागातील गावांना पंप नादुरुस्त असल्यामुळे फ़क्त २ मिमी. पाण्याचा प्रवाह होतो परिणामी शेतक-यांना पाणी पोहचत नाही यावर उपाययोजना करणे.धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र. १ अंतर्गत कवलेवाडा पंपगृहापासुन ४.३३५ किमी लांबीच्या १४०० मीमी. व्यासाच्या दोन रांगा अंथरण्यात आल्या आहेत. याद्वारे बोदलकसा उजव्या कालव्याच्या सा.क्र. २०५०० मी. वर वितरणकुंड बांधुन पाणी सोडण्यात येत आहे. बोदलकसा उजव्या मुख्य कालव्याच्या सा.क्र. २०५०० मी वरुन कवलेवाडा वितरीका निर्गमीत होत असुन त्यावरील उपलघुकालवे व direct आउटलेट वरुन ९४६.८७ हे. सिंचन होत आहे व सा.क्र. २२६७५ मी वरुन तिरोडा वितरीका निर्गमीत होत असुन त्यावरील उपलघुकालवे व direct आउटलेट वरुन १२७२.२५हे. सिंचन होत आहे. तसेच बोदलकसा उजव्या मुख्य कालवा सा.क्र. २०५०० ते सा.क्र. ३२१०० मी पंर्यंत सदर योजनेद्वारे १९४२.२८ हे. सिंचन होत आहे, असे एकुण बोदलकसा उजव्या कालव्याद्वारे १६ गावातील ४१६२ हे. क्षेत्रास सिंचन नियोजीत आहे.त्यापैकी खरीप सन २०२५ हंगामामध्ये २५१६.३८हे. क्षेत्र प्रत्यक्षपणे सिंचीत झालेले असुन लाभक्षेत्रातील विहिरी व पावसाच्या पाण्याने अप्रत्यक्षपणे १५००हे. सिंचन झालेले आहे, असे एकुण ४०१६.३८हे. सिंचन झालेले आहे. उर्वरीत मौजा सोनोली व भोंबोडी हे गाव सालेबर्डी लघुकालव्यावरुन सिंचन होत असुन सदर कालव्याच्या दुरुस्तीची कामे चालु असल्याने सदर गावांना पाणी पोहचू शकले नाही.तसेच मौजा घाटकुरोडी व चांदोरी हे गाव बोदलकसा उजव्या मुख्य कालव्यावरील पुच्छ भागाकडील असल्याकारणाने त्यामागील भागाकडील शेतकरी पाणी आडवल्याकारणाने Tail भागाकडे पाणी पोहचण्यास अडचण निर्माण होत आहे.करीता सिंचन प्रापणसुची २०२५-२६ अंतर्गत सदर कालव्याची कामे प्रगतीपथावर असुन जुन २०२६ पर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आहे. सर्व व्ही. टी. पंपामध्ये पंप परिचलना दरम्यान कंपन होत असुन मोटार सुद्धा गरम होडुन ओव्हरहीट होत असल्यामुळे सदर पंप व मोटारीमध्ये मोठी दुरुस्ती उद्भवत आहेत. बुस्टर पंपाचे कंपनामुळे त्याचे फ़ाउंडेशन मोडकळीस आल्यामुळे बुस्टर पंपाचे शाफ्ट बेंड होणे, बेअरींग फुटणे व त्याची मोटार वाईंडीग जळण्यासारख्या समस्या उदभवत आहेत. कंट्रोल रुम मधील एल. टी. पॅनल नादुरुस्त असल्यामुळे ते बदलविणे आवश्यक आहे. सद्यस्थितित ३ पंप चालु असून १ पंपाची दुरुस्ती चालु आहे. एकंदरीत ४ ही पंपांचे आयुष्यमान संपले असुन पंपाची कार्यक्षमता कमी झालेली आहे. करीता नवीन पंप बसवणे अतिआवश्यक आहे.कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन यांत्रिकी विभाग क्र.१, भंडारा यांचे पत्र क्र.१८०८/उसीयांविक्र.१भं/तांशा-१/धापेवाडा टप्पा-१ उसियो/२०२५ दि.१३.१०.२०२५ अन्वये पत्रामध्ये नमुद तांत्रिक बाबी लक्षात घेता नवीन पंपाचा पुरवठा आवश्यक आहे, असे कळविले आहे.मा. मुख्य अभियंता (यां), जलसंपदा विभाग, नाशिक यांचे पत्र क्र. मुअया/ता६ विशेष दुरुस्ती/५११/२०२५ दि.२८.०२.२०२५ नुसार आयुर्मान पुर्ण झालेल्या उपसा सिंचन योजनेमधील यंत्रसामुग्री बदलविण्याची अंदाजपत्रके सादर करण्याचे निर्देश प्राप्त असल्याने कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग, भंडारा या विभागीय कार्यालयाने मंडळ कार्यालयास अंदाजपत्रक मंजुरीकरीता सादर करण्यात आलेले आहे, असे विभागीय कार्यालयास कळविण्यात आले आहे आदी विषयावर बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये प्रामुख्याने कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, मुख्य अभीयंता गोसे खुर्द जयंत गवळी, मुख्य अभोयंता जलसंपदा चोपडे, अधीक्षक अभियंता विश्वकर्मा,कार्यकारी अभियंता श्रीकांत मस्कावार उपस्थित होते.





Total Users : 883054
Total views : 6488485
