कलार समाज स्नेहमिलन, सत्कार सोहळा संपन्न! तुमसरमध्ये भीमसंगीताचा जल्लोष! भीमकन्या कडूबाई खरात यांच्या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध  संकटातील मुलांसाठी जीवनरेखा…1098 चाइल्ड हेल्पलाइन… बोटांनी बोलण्याच्या काळात ओठांनी बोलावे – श्री जयंत चावरे कॉपीमुक्त अभियानामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होणार :- प्राचार्य – राहुल डोंगरे परसवाडा येथे काँग्रेसला धक्का – अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश मौजा परसवाडा येथील कॉग्रेस पक्षातून भाजपा मध्ये पक्ष प्रवेश  कलचुरी एकता सर्ववर्गी संघ नागपुर महाराष्ट्र प्रदेश की ओर से ऐतिहासिक सामूहिक विवाह और परिचय सम्मेलन संपन्न! आज स्व मनोहरभाई पटेल की ११९ वी जयंती दिवस के उपलक्ष पर स्वर्णपदक वित्रक समारोह! आज स्व मनोहरभाई पटेल की ११९ वी जयंती दिवस के उपलक्ष पर स्वर्णपदक वित्रक समारोह!
1710994486762
1739073774320
df
IMG-20231030-WA0012
mamacha
ind
Indian Head Line photo

खरीप हंगामातील धान शेतीला २५% पीक विमा जाहीर करा-माजी आमदार चरण वाघमारे

1710994486762
TUSHAR PASHINE PRESS I CARD
TUSHAR I CARD PRESS AHILYARAJ

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

भंडारा-केंद्र सरकारच्या शासन निर्णयानुसार अद्यापही धान उत्पादक शेतकरी धान पिकाची लागवड करू शकले नसल्याने असे शेतकरी पीक विम्याकरिता पात्र ठरत असल्याने राज्य सरकारने तात्काळ पीक विमा जाहीर करण्याची मागणी भारत राष्ट्र समिती पुर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी राज्य सरकारला केली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली देशाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी अनेक उपाय योजना राबविण्याचा प्रयत्न केला. त्यात शेतमालाला योग्य भाव असो किंवा इतर सुविधा असो. त्यातील एक भाग म्हणजे पीक विमा योजना सुद्धा आहे .या पीक विमा योजनेत केंद्र सरकारने शासन परिपत्रका द्वारे विमा मिळण्याची विविध निकष जाहीर केले आहे. यात ज्या शेतकऱ्यांची कोणत्याही कारणास्तव धान पिकांची लागवड ३१ जुलै पर्यंत झाली नाही असे सर्व शेतकरी २५ टक्के विम्याकरिता पात्र ठरतात.पुर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर हे सर्व जिल्हे मोठ्या प्रमाणात धान पीक घेतात.परंतु सातत्याने पावसाच्या व्यत्ययाने व राज्य सरकार च्या शेतकऱ्यांप्रति उदासीन धोरणाने वेळेवर दिवसा वीज पुरवठा उपलब्ध न झाल्याने अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा जास्त धान पिकांची लागवड होऊ शकली नाही. राज्य सरकारमध्ये भंडारा, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असुन सरकारचे सर्वेसर्वा सुध्दा आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांची थोडी जरी दया असेल तर या सर्व धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवुन दिल्याप्रमाणे ५०% पीक विम्याचा लाभ विनाविलंब तात्काळ देण्याची मागणी भारत राष्ट्र समिती पुर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना प्रसिद्धी माध्यमातून केली आहे.

Leave a Comment

1710994486762
TUSHAR PASHINE PRESS I CARD
TUSHAR I CARD PRESS AHILYARAJ
loader-image
BHANDARA GONDIA
2:41 pm, Feb 12, 2025
temperature icon 33°C
clear sky
Humidity 12 %
Pressure 1012 mb
Wind 13 Km/h
Wind Gust Wind Gust: 15 Km/h
Clouds Clouds: 0%
Visibility Visibility: 10 km
Sunrise Sunrise: 7:00 am
Sunset Sunset: 6:28 pm

Our Visitor

5 3 1 4 7 9
Total Users : 531479
Total views : 553867