
सोन्या-चांदीत नसते, तर ते विचारसंपन्न, समतामूल्यांनी घडलेल्या नागरिकांमध्ये असते. आपल्या समाजजीवनात अंधश्रद्धा, जातिव्यवस्था, अन्याय आणि विषमता यांचा अंधकार दीर्घकाळ पसरलेला होता. अशा वेळी प्रबोधनकार ठाकरे, रामास्वामी पेरियार आणि कॉम्रेड शरद पाटील हे तीन ज्येष्ठ विचारवंत तेजस्वी दीपस्तंभ ठरले.
प्रबोधनकार ठाकरे : समाजजागृतीचे अग्रदूत
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी धर्मांधता, जातिभेद आणि अज्ञानाविरुद्ध कठोर संघर्ष केला. सत्यशोधक चळवळ आणि फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा त्यांनी लोकांपर्यंत पोचवला. “विचारांच्या क्रांतीशिवाय खऱ्या स्वातंत्र्याचा लाभ नाही” हा त्यांचा ठाम संदेश होता. आजच्या प्रशासनाने आणि समाजाने त्यांच्या प्रबोधनाचा मार्गदर्शक दीप म्हणून स्वीकार केला, तर विकासात सर्वसमावेशकता आपोआप येईल.
रामास्वामी पेरियार : स्वाभिमान आणि सामाजिक न्याय
दक्षिण भारतातील पेरियार ई.व्ही. रामास्वामी यांनी महिलामुक्ती, शोषणाविरुद्ध बंड आणि स्वाभिमान आंदोलनाचा ध्यास घेतला. जातिव्यवस्थेविरुद्ध त्यांच्या परखड लढ्यामुळे तमिळनाडूत सामाजिक समता दृढ झाली. पेरियारांचे विचार आजच्या तरुणाईला सांगतात की – “विचार करण्याचे धैर्य आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे साहस समाजाला परिवर्तन घडवते.”
कॉम्रेड शरद पाटील : फुले-आंबेडकर-मार्क्स विचारसरणीचे त्रिवेणी संगम कॉम्रेड शरद पाटील यांनी फुले-आंबेडकर-मार्क्स यांच्या क्रांतिकारी विचारांचा संगम घडवून समाजपरिवर्तनाची नवी दिशा दाखवली. त्यांच्या लेखनात वर्ग, जात आणि लिंग विषमता यांचे सखोल विश्लेषण दिसते. “शोषणाविरहित समाजरचना हीच खरी लोकशाही” हा त्यांचा ठाम विश्वास होता. ग्रामीण जनतेला जागृत करण्यासाठी त्यांनी आयुष्य वाहिले.
आजची प्रेरणा आणि आपली जबाबदारी
लोकांसाठी संदेश : आपणही या त्रिवेणी विचारधारेतून समतेचे, बंधुतेचे आणि विवेकाचे मूल्य जीवनात रुजवूया. शासन-प्रशासनासाठी संदेश : धोरणे आखताना वंचित, दुर्बल, शोषित घटक केंद्रस्थानी ठेवावेत; तेव्हाच समाजात खरी न्यायसंगत प्रगती साधेल. पुढील पिढीसाठी संदेश : शिक्षण, विवेकशीलता आणि समता यांचा मार्ग स्वीकारणे हेच त्यांना योग्य आदर्श ठरेल.
अपेक्षा : प्रबोधनकार ठाकरे , रामास्वामी पेरियार आणि शरद पाटील यांच्या जयंती केवळ स्मरणदिन नाहीत, तर ते आपल्या कर्तव्यांची, सामाजिक जबाबदारीची आणि परिवर्तनशील विचारांची आठवण करून देणारे दिवस आहेत. त्यांच्या प्रेरणेनेच आपण न्याय्य, समतामूलक आणि मानवी मूल्यांनी समृद्ध भारत घडवू शकतो.तर संकल्प करु या आणि विचाराला कृतीची साथ देऊ या, हेच खरे अभिवादन!
राहूल डोंगरे, “पारस निवास” शिवाजी नगर तुमसर जि भंडारा.
मो. न.9423413826





Total Users : 883145
Total views : 6488593
