Search
Close this search box.
रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज.. करडी मुंढरी रस्त्याचे काम कासव गतीने कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिराला सुरवात पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची भंडारा जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

अहमदपूर व चाकुर तालुक्यातील खरीप पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांकडे भाजपाची मागणी. 

लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित

लातूर:- अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या संकटात सापडल्याने खरीप हंगामातील पिकाचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील व माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूरचे तहसीलदार यांच्या फार्मात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

गेल्या एक महिन्या पासून पाऊस पडला नसल्याने चालू खरीप हंगामातील पिके वाळल्याने दुष्काळ सदग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आसल्याने सरसकट तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच गत वर्षीच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती प्रोत्साहन पर योजने अंतर्गत पन्नास हजार रुपयांचा लाभ अध्याप अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही. तोही प्रोत्साहन पर शेतकऱ्यांना पन्नास हजाराचा लाभ देण्यात यावा. गतवर्षीच्या खरीप हंगामातील उत्पादनावरील आधारित पिक विमा अद्याप शेतकऱ्यांना दिला नाही. तोही सरसकट पिक विमा तात्काळ देण्यात यावा अशा काही अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भातील निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी लातूर यांना तहसीलदार अहमदपूर यांच्या फार्मत निवेदन पाठवण्यात आले आहे. 

सदरील निवेदनावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस त्रंबक आबा गुट्टे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, श्रीकांत भुतडा,राजकुमार खंदाडे, अमित रेड्डी, रामभाऊ बेल्लाळे,नाथराव केंद्रे,बाळासाहेब मुंडे, दत्ता सुरनर, निखिल कासनाळे,बालाजी मुंडे, सुरेश जाधव, गणेश मुंडे,बालाजी बोबडे,रामानंद मुंडे,केरबा कांबळे, सोमनाथ पुणे,संग्राम नरवटे,बबनराव नवटक्के,भास्कर केंद्रे, अन्वरखा पठाण, शरद मुंडे, नामदेव आरदवाड,नामदेव फाजगे,राम देवकते,राजकुमार येणगे,राजकुमार नरवटे,नवनाथ जाधव, अंकुश सुर्यवंशी, परमेश्वर भोसले, गजानन गुंडीले,विष्णू पौळ, सोहेल शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
2:00 am, May 10, 2024
temperature icon 32°C
overcast clouds
Humidity 35 %
Pressure 1007 mb
Wind 7 Km/h
Wind Gust Wind Gust: 9 Km/h
Clouds Clouds: 91%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:56 am
Sunset Sunset: 6:56 pm

Our Visitor

5 1 1 5 4 1
Total Users : 511541
Total views : 523161