भंडारा-भंडारा जिल्हा धानाचा कोठार म्हणून गणल्या जात असुन सोबतच दुध उत्पादनातून नावलौकिकास येत असला तरी मात्र राज्य सरकार या स्वेतक्रांतीला ब्रेक लावुन शेतकऱ्यांचे आर्थीक शोषण करित असल्याचा आरोप भारत राष्ट्र समिती पुर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे.
भंडारा जिल्हा संपूर्णतः शेतीवर अवलंबून असुन धानाचा कोठार म्हणून या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी शेतीव्यवसाबरोबरच जोडधंदा म्हणून गायी म्हैशीचे संगोपन करुन मोठया प्रमाणात दुग्धव्यवसाय करीत आर्थीक उत्पन्न घेण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. गायी म्हैशीचे संगोपन करुन दुध उत्पादनाचा विचार केल्यास पशुखाद्याचे दर खुप असूनही त्यामानाने दुधाचे दर खूपच कमी आहे. तरीसुध्दा राज्यसरकार शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत पकडण्याचा काम करीत आहे. यावर्षी खरीप हंगामात अवकाळी पाऊस, किडींचा प्रादुर्भावाने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले असतांना अद्यापही सरकारकडून आर्थिक मदत मिळाली नाही. त्यातच सरकारने दुधाचे दर वाढवण्याऐवजी प्रती लिटर सात ते आठ रुपये कमी करुन राज्य सरकार शेतकऱ्यांचे जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत असुन दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करीत असल्याचे स्पष्ट आरोप भारत राष्ट्र समिती पूर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे.